‘ऑक्टोबरच्या आधी अजितदादा मुख्यमंत्री होतील, फडणवीस दिल्लीला जातील आणि शिंदे गट …’

पुणे – आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादीत झालेल्या बंडाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याच्या राजकारणात नेमके काय सुरु आहे आणि पुढे काय होणार याचा अंदाज भल्याभल्यांना लावता येत नसल्याचे चित्र आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Choudhary)यांनी एक भविष्यवाणी केली असून पुढे काय होणार हे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

आपल्या पोस्ट मध्ये ते म्हणतात, ऑक्टोबरच्या आधी अजितदादा मुख्यमंत्री होतील. फडणवीस दिल्लीला जातील. चंद्रकांतदादा किंवा राधाकृष्ण विखे पाटील उपमुख्यमंत्री होतील आणि शिंदे गट सातारच्या मळ्यात. राहता राहिले भक्त… त्यांना कोमात जाण्याशिवाय दुसरीकडे कुठंच जाता येणार नाही.

चारदा उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीच होण्यासाठी कुठं जात नसतो. स्वतःच्या हातानं सगळ्या क्लिनचिटा मिळवण्याचं आणि देण्याचं भाग्य दादांना लाभणार.अशी भविष्यवाणी आता चौधरी यांनी केली आहे.