Maharashtra Congress | मुस्लिमांची मते हवी, पण उमेदवार नको; काँग्रेसच्या नेत्याचा प्रचार न करण्याचा निर्णय
महाराष्ट्र काँग्रेसचे (Maharashtra Congress) कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून ही माहिती दिली. काँग्रेसने महाराष्ट्रातून एकही मुस्लिम उमेदवार न दिल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
नसीम म्हणाले, महाविकास आघाडीने (MVA) महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांवर एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नाही. युतीला फक्त मुस्लिमांची मते हवी आहेत. लोकसभा निवडणुकीत उरलेल्या जागांवर मी पक्षाचा प्रचार करणार नाही. मी प्रचार समितीचा राजीनामा देत आहे.
ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम (Maharashtra Congress) संघटना, नेते आणि कार्यकर्त्यांना काँग्रेस अल्पसंख्याक समाजातील एका उमेदवाराला तिकीट देईल अशी अपेक्षा होती, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. काँग्रेसला मुस्लिम मतं पाहिजे आहेत, पण उमेदवार नको का? असा प्रश्न विचारला जात आहे. मी या प्रश्नाचं उत्तर मुस्लिम जनतेला देऊ शकत नाही, त्यामुळे मी या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाही, असं नसीम खान यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
Maharashtra | Congress leader Mohammed Arif (Naseem) Khan writes to party president Mallikarjun Kharge and quits as a star campaigner of the party for the remaining phases of the Lok Sabha polls.
"MVA (Maha Vikas Aghadi) has not nominated a single Muslim candidate in… pic.twitter.com/BkBoLqeZ2l
— ANI (@ANI) April 26, 2024
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर