“स्त्रीच्या भांगेत सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र नसेल तर प्लॉट रिकामा”, बागेश्वर बाबांवर होतेय टीका

बागेश्वरचे बाबा (Bageshwar Baba) पंडित धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एखादी महिला विवाहित आहे, हे ओळखण्याची दोन लक्षणे असतात. पहिला- भांगेतील सिंदूर, दुसरे- गळ्यातले मंगळसूत्र. जर महिलेच्या भांगेत सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र नसेल, तर समजावे की प्लॉट रिकामा आहे, असे वक्तव्य पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे.

ज्या स्त्रिच्या डोक्यात सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र आहे, तिची रजिस्ट्री झाल्याचे दुरूनच ओळखायला येते, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत. ग्रेटर नोएडा येथील कथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी या गोष्टी सांगितल्या. त्यांनी स्त्रीबद्दल केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी स्त्रियांबद्दल असे वक्तव्य केल्याने धीरेंद्र शास्त्रींवर टीका केली आहे.