अरेरे ! बैलगाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात वृध्द शेतकऱ्याचा झाला मृत्यू 

तुळजापूर :  तालुक्यातील रायखेल येथील वृध्द  शेतकरी ( शेतमजूर ) शेतातून घराकडे बैलगाडी घेऊन येताना बैलगाडी पलटी होऊन शेतकऱ्यांच्या अंगावर पडून त्यात त्याचा मुत्यु  झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात गाडी बसलेली महिलाही जखमी झाल्याची घटना  बुधवार दि २८रोजी संध्याकाळी १० ते ११ च्या दरम्यान घडली.

मुत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव  भिमराव   लक्ष्मण भोवाळ वय ७७ वर्षे. यांचा  मृतदेह शवविछेदनासाठी   उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बैलाला चारा आणण्यासाठी बैलगाडी घेऊन शेतामध्ये गेले होते. चारा घेऊन घराकडे येताना शेतरस्ता व्यवस्थीत नसल्या कारणाने बैलगाडी उलटल्याने शेतकऱ्याच्या मृत्यू झाल्याची चर्चा रायखेल येथे केली जात होती. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.