Mahadev Jankar: बापाच्या जीवावर मतं मागणाऱ्या माणसांमुळे प्रगती होणार नाही, जानकरांची ओमराजेंवर टीका

Mahadev Jankar: धाराशिव लोकसभा मतदारसंघात येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोमात सुरू आहे. आमदार राणा जगजितसिंह हा मितभाषी माणूस आहे. हा बोलतो कमी अन् काम जास्त करतो.  तर दुसरीकडे ओमराजेंबद्दल बोलायलाच नको. ते बोलतात जास्त अन् बापाच्या जीवावर मतं मागतात. अशा माणसांमुळे आपली प्रगती होणार नाही, अशी टीका रासप नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली.

धाराशिव येथील लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत जानकर बोलत होते.

पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच  होणार आहेत. त्यांच्या कडून निधी आणणारे डबल इंजिन सरकार महायुतीच्या रूपाने राज्यात आहे. आज धाराशिव भागात पाण्याचा, एमआयडीसी, रेल्वेचा, मेडिकल कॉलेजचा प्रश्न आहे. तो सोडवायचा असेल तर केंद्रातून निधी आणणे गरजेचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा महायुतीच्या विचारांचा खासदार संसदेत जाईल. विरोधी विचारांचा खासदार गेल्यास आपल्या भागात विकासकामांसाठी निधी येणार नाही. विकास करायचा असेल तर राज्यात आणि केंद्रात आपल्या विचारांचे सरकार आवश्यक आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय