पाच-दहा भक्तांचे प्राण गेल्यानंतरच आमदार पुत्र विक्रम शिंदेंना जाग येणार का? बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सवाल

करमाळा – करमाळा देवीचा माळ पायथ्याशी उसाचा ट्रॅक्टर पलटी दिवसा आड होत आहेत. विक्रम शिंदे यांच्या साखर कारखान्याचे वाहतूक करणारी उसाचे ट्रॅक्टर यु टर्न करताना पलटी होतात. या आठवड्यात चार ट्रॅक्टर पलटी झाले मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी कोणी हजर नसल्यामुळे जीवित हानी झाली नाही किंवा दुर्घटना झाली नाही. मात्र येणाऱ्या काळात कधीही मोठा अपघात होऊन जीव जाऊ शकतात. या घटना थांबण्यासाठी कारखान्याचे चेअरमन विक्रम शिंदे कोणती उपायोजना करत नाही. यामुळे दोन-चार जणांचे प्राण गेल्यानंतरच विक्रम शिंदे या प्रकरणाची दखल घेणार का? असा खडा सवाल बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उपस्थित केला आहे.

करमाळा देवीचा माळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते. हजारो भक्त देवीच्या दर्शनाला पहाटेपासून गर्दी करतात. पांडे कडून येणारे ट्रॅक्टर टर्न मारून संगोबाच्या दिशेने वळतात. यावेळी पहिला ट्रॅक्टर ट्रॉली पास होते मात्र दुसरी ट्रॉली पलटी मारते. या घटना वारंवार घडतात. या रस्त्यावरून शाळेला येणारे जाणारे मुले सुद्धा चालत असतात. भक्त चालत असतात दुर्दैवी घटना घडली तर पाच दहा निष्पाप लोकांची जीव जाऊ शकतो.पांडे कडून येणाऱ्या रस्ता उस्मानाबाद जाणारा रस्ता या जवळपास तीन फूट चढ आहे. यामुळे हे ट्रॅक्टर पलटी मारतात याची दखल तात्काळ विठ्ठल शुगर चे चेअरमन विक्रम शिंदे यांनी घेऊन पुढील अपघात टाळावेत आवाहन चिवटे यांनी केले आहे.

विक्रम शिंदे यांच्या कारखान्यातील बॉयलर मधून उडणारी राख अजूनही करमाळ्यातील सर्व छतावर कारावर गाड्यांवर पडते. पिकाच्या प्रत्येकाच्या घरात या राखे मुळे भांडी खराब होत आहेत. या सूक्ष्म राखेमुळे अनेकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. अनेकांना दमा सारखे आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.अशी ही विषारी राख करमाळा शहरात पसरत राहिली तर येणारी भावी करमाळ्यातील संपूर्ण नवी पिढी तसेच वयोवृद्ध झालेली मंडळी दमाग्रस्त व फुफुसाच्या आजाराने ग्रस्त झालेले असेल. यामुळे या बॉयलरची तात्काळ दुरुस्ती करून राखीची व्यवस्था विक्रम शिंदे यांनी करावी अन्यथा आम्हाला नाईलाजाने प्रदूषण महामंडळाकडे तक्रार करावी लागेल असा इशाराही चिवटे यांनी दिला आहे. करमाळ्यातील जनता अन्याय सहन करते असा समजला असेल तर तो शिंदे यांनी बाजूला ठेवावा व तात्काळ वरील प्रश्नांची दखल घ्यावी अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेने केले आहे.