दैनिक सामनावर बंदी घाला, प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांची मागणी 

मुंबई – दैनिक सामनावर (Dainik Saamna) बंदी घालण्याची मागणी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (lawyer Gunaratna Sadavarte) यांनी केली आहे. दैनिक सामनामधून अप्रत्यक्षरित्या रश्मी शुक्ला यांचं खच्चीकरण होत असल्याचं कारण दिलंय. यासंदर्भात आरएनआय कार्यालयाकडं लिहित आहोत. त्यासोबतच राष्ट्रीय महिला आयोगाला तक्रार करत आहोत. राज्यातील गृह मंत्रालयानं याबाबत दखल घ्यावी, अशी मागणही सदावर्ते यांनी केली.

रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्याकाळात राज्यातील अनेक नेत्यांचे फोन कॉल टॅप  केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यावरून एप्रिल 2022 मध्ये आरोपपत्रही दाखल झालं होतं.

दरम्यान, सरकार बदलानंतर पुढची कारवाई थांबली आहे. मात्र तरीही सामना मधून शुक्ला यांच्यावर शरसंधान सुरूच आहे. याच मुद्द्यावरून आता सदावर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी थेट सामनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.