राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही; दिग्गज नेत्यांने केला दावा

सातारा : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांच्या एका वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. हा समाचार घेताना त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष (NCP) अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही असा दावा केला आहे. सोबतच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील काही नेत्यांना सत्तेविना राहवत नाही, सत्तेविना ते राहू शकत नाही. सत्तेविना ते तळमळत आहे, असं देखील देसाई यांनी म्हटले आहे.

जर राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सत्तेत आली तर लोकशाही टिकली, आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सत्तेतून बाजूला गेली की लोकशाही धोक्यात आली, पण मला राजे साहेबांना सांगायचं आहे असं म्हणत आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे. लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे. लोकशाही मार्गानेच सभापती यांची निवड केली आहे. आपणही विधानपरिषदेचे सभापती होता, आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहेत, असं मंत्री देसाई यांनी म्हंटले आहे.