माफी न मागता राज ठाकरे अयोध्येत आल्यास 5 लाख उत्तर भारतीय विरोध करणार 

अयोध्या  – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा देत भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh) यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असताना भाजपाचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह (BJP’s Kaisarganj MP Brijbhushan Singh) यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणि स्वपक्षाला अडचणीत आणले आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाचे (BJP) नेते राज ठाकरे यांची पाठराखण करत असले तरी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदाराने मात्र राज यांना आव्हान दिले आहे.

काल  ब्रृजभूषण सिंह यांनी बोलावलेल्या धर्मसंसदेत राज ठाकरेंना विरोध करण्यावर शिक्कामोर्तब झालं. उत्तर भारतीय(North Indians), तसंच उत्तर प्रदेशातल्या साधू संतांची माफी न मागता राज ठाकरे अयोध्येत आल्यास..5 लाख उत्तर भारतीय विरोध करणार, असा निर्णयच उत्तर प्रदेशातल्या धर्मसंसदेत झाला.

ब्रृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी अयोध्येतल्या साधू संतांनाही एकत्र आणलंय..त्यामुळं अयोध्येत यायचं असेल तर संधीचं सोनं करुन राज ठाकरेंनी माफी मागावी, असं ब्रृजभूषण म्हणतायत. अयोध्येतल्या संसदेत 50 हजारांची गर्दी होईल, असा दावा ब्रृजभूषण यांनी आधीच केला होता..आणि प्रत्यक्ष धर्मसंसदेतही राज ठाकरेंच्या विरोधासाठी प्रचंड गर्दी जमली. राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी अयोध्येतले साधूही आक्रमक आहेत.असं सध्या चित्र आहे.