केवढा हा निर्लज्जपणा म्हणत चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर मार्मिक टीका 

Maharashtra Political crisis –   महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे (Eknath SHinde) विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात शिवसेना भाजप सरकारला दिलासा दिला असला तरीही एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हीप भरत गोगावले बेकायदेशीर आहेत असे न्यायालयाने म्हटले आहे.राज्यपालांचे भूमिकेवर ताशेरे ओढत  उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले असते असं कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, या निकालानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि  उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विरोधकांवर टीका केली आहे. या टीकेला आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदीजींचा फोटो लावून तुमचे आमदार निवडून आले आणि नंतर कांग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले… तेंव्हा उद्धव ठाकरेंनी मतदारांचा विश्वासघात केला. ही लोकशाहीची हत्या नाही का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

बरं सुप्रीम कोर्टानं स्पष्टच केलंय,तुम्ही राजीनामा दिल्यामुळे सरकार पडलं. आता पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री करता येणार नाही. म्हणजे चूक तुमचीच,शस्त्र तुमच्या हातात… हत्या तुम्हीच केलीय आणि आता लोकशाहीच्या नावानं गळे काढताय.. केवढा हा निर्लज्जपणा… असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.