Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणातील सर्वात मोठी बातमी, अवघ्या काही तासात मुख्य आरोपी ताब्यात

Gangster Sharad Mohol murder – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (gangster Sharad Mohol) याची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शरद मोहोळवर 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली.

गोळीबारात शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे. यानंतर पुणे पोलिसांनी आपली सर्व सूत्र हलवली आणि अवघ्या काही तासांच्या आतमध्ये मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह सात साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपींना शिवापूर टोल नाक्याच्या पुढे किकवी ते शिरवळ दरम्यान अटक केली.

शरद मोहोळ दुपारी एक वाजता घराबाहेर पडला होता. त्यावेळी आरोपी त्याच्यासोबतच होते. शरद मोहोळ पुढे चालत असताना मुन्ना पोळेकर याने चार गोळ्या मारल्या होत्या. यामधील एक पायाला आणि दोन पाठीला लागल्या. जेव्हा शरद मोहोळ हल्ला कोणी केला हे पाहायला मागे फिरला त्यावेळी त्याच्या छातीत चौथी गोळी मारली. गोळ्यांच्या आवाजाने बाजूचे सर्वजण बाहेर आले तेव्हा शरद मोहोळ जखमी अवस्थेत पडला होता आणि आरोपी पसार झाले होते.

गुन्ह्याचा तपास करताना पुणे शहर गुन्हे शाखेची तपास पथके पुणे शहर परिसर, पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. पुणे सातारा रोडवर किकवी ते शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करत पोलिसांनी 8 आरोपींना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांच्याकडून 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड आणि दोन चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

शरद मोहोळ याची हत्या जमिनीच्या पैशाच्या जुन्या वादातुन केली असल्याचं प्रथम दर्शी तपासात निष्पन्न झालं आहे. सदरची कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात