‘उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झाले आहेत, त्यांना फक्त त्यांची खुर्ची जपायची आहे’

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान, कालच्या या सभेवर सत्ताधारी आणि विरोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या सभेमध्ये भाजपवर झालेल्या टीकेनंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झाले आहेत. त्यांना फक्त त्यांची खुर्ची जपायची आहे. ते सत्ता लंपट झालेले आहेत. त्यामुळे त्यांना औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पाया पडा, नमाज पढा किंवा फुलं वाहा उद्धव ठाकरेंना काहीच फरक पडत नाहीये.

भोंग्यांच्या प्रश्नावर ते एक शब्दही बोलायला तयार नाहीत आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर देखील एक शब्द देखील बोलायला ते तयार नाहीये. यामुळे त्यांच हिंदूत्व किती बेगडी आहे हे सर्वांच्या लक्षात आल आहे, असा घणाघात गिरीश महाजनांनी केला.उद्धव ठाकरेंनी आता जनतेसमोर जावं आणि जेव्हा निवडणुका होतील तेव्हा जनता त्यांना कोण गधाधारी हे दाखवून देईल अशी टीका देखील महाजन यांनी केली.