पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार – नितीन गडकरी

अहमदनगर – येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. अहमदनगरमध्ये पेट्रोलला हद्दपार करा, कार आणि बस इथेनॉलवर चालवा. माझा ट्रॅक्टर बायो सीएनजी वर आहे, आपला शेतकरी अन्नदाता बरोबर ऊर्जादाता बनला पाहिजे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी करतो तेच बोलतो आणि बोलतो तेच करतो असं ते म्हणाले.

मागच्या जन्मी जो पाप करतो तो या जन्मी साखर कारखाना काढतो, नाहीतर वर्तमानपत्र चालवतो अशी मिश्किल टिप्पणी नितीन गडकरी यांनी केली. पश्चिम महाराष्ट्र मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे तर मराठवाडा फस्ट क्लासमध्ये येणारी शाळा असल्याचंही ते म्हणाले.