माझे वडील सकाळी जय मोदी आणि संध्याकाळी जय योगी जी बोलतात – कंगना रणौत

शिमला – बॉलीवूडची दबंग गर्ल कंगना रणौतने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे आणि हे देखील सांगितले आहे की तिचे कुटुंब देखील पीएम मोदी आणि त्यांच्या कामामुळे किती प्रमाणात प्रभावित आहे. तिने सांगितले की त्यांचे वडील सकाळी जय मोदी आणि संध्याकाळी जय योगी म्हणतात. कंगनाने असेही सांगितले की 2014 पूर्वी तिचे कुटुंब काँग्रेसला मानणारे होते, परंतु 2014 नंतर तिने राजकीय धर्मांतर केले.

इंडिया टुडे कार्यक्रम  ‘पंचायत’  शिमला, हिमाचल प्रदेश येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कंगनाने राजकारणाबाबतचे तिचे व्हिजन शेअर केले.ती म्हणाली,मी एका राजकीय कुटुंबातील आहे. 2014 मध्ये मोदीजी आले तेव्हा अचानक परिवर्तन झाले आणि माझ्या वडिलांनी मला पहिल्यांदा मोदीजी आणि त्यांच्या कामांबद्दल सांगितले, म्हणून 2014 मध्ये आमचे अधिकृतपणे धर्मांतर झाले.

माझ्या मते संपूर्ण देशाला जागे करण्यासाठी एक व्यक्ती पुरेशी आहे. आपल्या देशाला अशा मजबूत व्यक्तीची खूप काळापासून गरज होती, जो देशाचे नेतृत्व करू शकेल, जसे मोदीजी करत आहेत.असं देखील ती म्हणाली.कंगना म्हणाली की, पीएम मोदींनी केलेल्या कामांची यादी संपू शकत नाही, परंतु ज्या प्रकारे त्यांनी सामान्य माणसाशी जोडले आहे आणि भारतीयत्वाचा आदर्श प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवला आहे.