‘ठाकरे परिवाराची बेनामी संपत्ती आता जप्त व्हायला लागलेली आहे त्यामुळे त्यांची अस्वस्थता दिसत आहे’

मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि राज्य सरकारवर (State GOV) हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक क्षणी असे वाटत आहे त्याच्या घोटाळ्याच्या लंकेत हनुमान (Hanumaan) स्वतः येऊन आग लावणार आहे. ठाकरे सरकारला भीती वाटणे ही स्वाभाविकच आहे. काही मंत्री जेलमध्ये तर अनेक मंत्री बेलवर आहेत. ठाकरे परिवाराची बेनामी संपत्ती (Anonymous assets) आता जप्त व्हायला लागलेली आहे त्यामुळे त्यांची अस्वस्थता दिसत आहे. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याची लंका जळू शकते असा घणाघात त्यांनी केला आहे.

आता आग लावण्याचे काम म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याचे आग लावण्याचे काम आणि घोटाळेबाजांवर कारवाई होणार ..आता आम्ही सर्वच जण ॲक्शन मोडमध्ये (Action Mode) गेलो आहोत आज देखील मी दिल्लीत एका वरिष्ठ नेत्यांशी बोललो श्रीधर पाटणकर (Shreedhar Patankar)  म्हणजे उद्धव ठाकरे यांचे साले त्यांच्या आणखी एका बेनामी कंपनी च्या संपत्ती ची माहिती मी दिली आहे.असं ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, पाठपुरावा करण्यासाठी मी गुरुवार आणि शुक्रवारी दिल्लीला जाणार आहे आता आदित्य, तेजस ठाकरे ,श्रीधर पटवर्धन यांच्या बेनामी कंपनी याच शेल कंपनी कडून आले आहे का हे आमचे टार्गेट आहे अशी गर्जना देखील त्यांनी केली आहे.