पैशामुळे टीम इंडियाला मानसन्मान मिळतो; मोहम्मद हाफिजने पुन्हा गरळ ओकली
लाहोर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. भारतीय संघ (Indian team) जगात कुठेही दौऱ्यावर गेला तरी तिथूनच सर्वाधिक कमाई होते. पण भारतीय संघाला त्याच्या कामगिरीमुळे जगभरात मान मिळतो की बोर्डाच्या पैशामुळे? गेल्या काही वर्षांत, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सर्व फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करून स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. पण पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिजची (Mohammad Hafeez) विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे.
हाफीजचा असा विश्वास आहे की जागतिक क्रिकेटमध्ये भारताला जास्त पैसे मिळतात. पीटीव्ही स्पोर्ट्सशी संवाद साधताना हाफिज म्हणाला, ‘मला जास्त माहिती नाही, पण मला माहित आहे की आपल्या समाजात जो कोणी जास्त कमावतो, प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतो. तो सर्वात गोड आहे. त्याला सर्वांचे खूप प्रेम मिळते. भारत हा महसूल निर्माण करणारा देश आहे. त्यामुळे जगभरात द्विपक्षीय मालिका असली तरी त्याला प्रायोजकत्व मिळते. त्यांना जॅकपॉट मिळतो. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे.
Laadla 😍 pic.twitter.com/V48JqojFmc
— Mohammad Hafeez (@MHafeez22) September 2, 2022
जेव्हा अँकरने हाफिजला विचारले की भरत लाडला त्याच्या चांगल्या खेळामुळे आहे की पैशामुळे, तेव्हा माजी अष्टपैलू खेळाडूने पैशाचा पर्याय निवडला. हाफिजने भारतीय संघाशी संबंधित वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याने भारतीय कर्णधाराला कमकुवत, भित्रा आणि गोंधळलेला असे संबोधले आहे.