‘काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता…’; मलिकांची खोचक टीका

'काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता...'; मलिकांची खोचक टीका

मुंबई  – बोकड, कोंबड्या ठेवून आणि नवसाने सरकार पडत नाही किंवा बनत नाही. सुरुवातीला भविष्यवाणीने सरकार पाडत होते आता नवसाने पाडण्याचा प्रयत्न होतोय परंतु या भ्रमात राहू नये असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला दिला आहे.

काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय… अशा आशयाचे ट्वीट करत नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांच्या मनसुब्यावर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी करुन थकले शेवटी त्यांची भविष्यवाणी खरी होईना म्हटल्यावर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करु लागले मात्र आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे अशी टिकाही नवाब मलिक यांनी केली.

२३ वर्षापूर्वी नारायण राणे मुख्यमंत्री होते त्या काळापासून नवसाचे बोकड आणि कोंबड्या दाखवल्या जात आहेत आणि आता त्या कोंबड्या व बोकडासाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावं लागतंय असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

आमचे आघाडी सरकार खंबीर आहे आणि ते पाच वर्ष पूर्ण करेल. याअगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांसाठी सरकार बनवले नाही तर २५ वर्षासाठी टिकेल असे जाहीर केले याची आठवणही नवाब मलिक यांनी भाजपला करुन दिली आहे.

भाजपचे जुने नेते आता थकले आहेत आता नवीन खेळाडूंना जबाबदारी दिली आहे ते बोलतील परंतु त्याने सरकार जात नाही असा जबरदस्त टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

https://www.youtube.com/watch?v=3AmlxDP4tcU

Previous Post
मार्च महिन्यात राज्यातील आघाडी सरकार कोसळणार अन् भाजपचं सरकार येणार - राणे

मार्च महिन्यात राज्यातील आघाडी सरकार कोसळणार अन् भाजपचं सरकार येणार – राणे

Next Post
... म्हणून चक्क नारायण राणे यांचे जयंत पाटील यांनी मानले खास आभार

… म्हणून चक्क नारायण राणे यांचे जयंत पाटील यांनी मानले खास आभार

Related Posts
विवाह समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमांना 50 व्यक्तींनाच परवानगी; कोरोना प्रतिबंधाचे नवे आदेश जारी

विवाह समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमांना 50 व्यक्तींनाच परवानगी; कोरोना प्रतिबंधाचे नवे आदेश जारी

वर्धा :- राज्यात गेल्या काही दिवसांपासुन कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने आणि मोठया प्रमाणात वाढ होत आहे. सोबतच ओमायक्रॉन रुग्णांची…
Read More
Narmada River | भारतातील एकमेव नदी जी उलट दिशेने वाहते; प्रेम, विश्वासघात आणि एकटेपणाच्या कहाणीशीही संबंध

Narmada River | भारतातील एकमेव नदी जी उलट दिशेने वाहते; प्रेम, विश्वासघात आणि एकटेपणाच्या कहाणीशीही संबंध

गंगा-यमुना प्रमाणेच नर्मदा नदी (Narmada River) देखील लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे, जिथे स्नान आणि ध्यानासाठी मोठ्या संख्येने…
Read More
संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही; जयंत पाटलांचा अजब दावा

संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही; जयंत पाटलांचा अजब दावा

सिंधुदुर्ग – मंत्री छगन भुजबळ हे निर्दोष झालेच की आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी…
Read More