‘तीस तीस वर्ष जे शिवसेनेत आहेत त्या आमदारांना घाण म्हणण्याचा नीचपणा पेंग्विन ने दाखवला’

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, ते आमदार आपले नव्हतेच, पक्षातील घाण गेली असं मत त्यांनी व्यक्त करत गेली ती घाण गेली असा घणाघातही त्यांनी बंडखोर आमदारांवर त्यांनी केले. ज्या बंडखोर आमदारांनी कारणं सांगत बंडखोरी केली आहे, त्यांची किती तरी कामं आपण केली आहेत, आणि जो जनतेचा निधी आहे, तो जनतेला तात्काळ दिला आहे असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आता जेष्ठ नेत्यांवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजप नेते निलेश राणे यांनी खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, तीस तीस वर्ष जे शिवसेनेत आहेत त्या आमदारांना घाण म्हणण्याचा नीचपणा पेंग्विन ने दाखवला, YZ ज्यांना घाण म्हटलं त्यांच्यामुळेच तुझा बाप त्या खुर्चीवर बसला आहे. याचा बाजार लवकरच उठणार आणि भर रस्त्यात उठणार. असं राणे म्हणाले आहेत.