मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँग्रेसच रोखू शकतं – पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : देशात सध्या पाच राज्याच्या निवडणुकीवरून राजकाण तापलंय. त्यात भाजपमध्ये होणाऱ्या बंडखोरीने आणखी खतपाणी घातलं आहे.  काँग्रेसकडून चारी बाजुंनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे.  अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींची हुकूमशाही वाटचाल आहे, त्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल फक्त काँग्रेस रोखू शकतो असे वक्तव्य केले आहे.

देशातील लोकशाही आणि संविधान आम्हाला वाचवाचंय. मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडलीय, लोकं बेरोजगार झालेत, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय आखाडा पुन्हा तापला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदींना शिव्या देऊ शकतो, मारू शकतो’ अशा आशयाचे वक्तव्य केल्याने देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. दुसरीकडे आता पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा मोदींचा हुकूमशहा असा उल्लेख केल्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये आधीच पेटलेला संघर्ष अजून पेटणार यात शंका नाही.