‘एवढी रडारड सिकंदर हरला म्हणून नाही तर चोंमड्याचं दुःख हे आहे की, या स्पर्धेत शरद पवार सोडाच, NCP चे पिल्लू देखील नव्हतं’
पुणे : नांदेडच्या शिवराज राक्षेने (shivraj rakshe ) सोलापूरच्या महेंद्र गायकवाड (mahendra gaikwad) याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महेंद्र गायकवाड याला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिद्रा थार ही गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला मानाची गदा, ट्रक्टर व रोख अडीच लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले. शिवराज जिंकला त्याचे कौतुक होतच आहे. पण सेमी फायनलमध्ये महेंद्रकडून पराभूत झालेल्या सिकंदर शेखची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
मातीवरची फायनल आणि महाराष्ट्र केसरीची सेमी फायनल कुस्ती महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखमध्ये झाली. यात महेंद्रला जास्त पॉईंट मिळाल्यामुळे सिकंदरचा पराभव झाला.सिकंदरच्या कुस्ती निर्णयात न्यायी भुमिका घेतली गेली नाही. खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोबतच सिकंदर वर अन्याय झाल्याचे देखील काहींचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रकाश गाडे (Prakash Gade) यांनी यावर भाष्य करत पवार समर्थकांना फटकारले आहे. ते म्हणाले, सिंकदर आज ना उद्या महाराष्ट्र केसरी जिंकेल! पण, सोशल मीडिया मध्ये एवढी रडारड सिकंदर हरला म्हणून नाही. चोंमड्याचं दुःख हे आहे की, महाराष्ट्रातील ही पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती की, ज्यात शरद पवार नव्हते.
सिंकदर आज ना उद्या महाराष्ट्र केसरी जिंकेल!
पण,
सोशल मीडिया मध्ये एवढी रडारड सिकंदर हरला म्हणून नाही.
चोंमड्याचं दुःख हे आहे की, महाराष्ट्रातील ही पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती की, ज्यात शरद पवार नव्हते.
1/3
— Prakash Gade (@PrakashGade13) January 15, 2023
शरद पवार सोडाच, NCP चे पिल्लू देखील नव्हतं. आता तुम्हाला कुस्ती आणि शरद पवार यांचे नाते काही सांगायलाच नको. शरद पवार 4 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष होते. पण, देशाच्या असोसिएशन अध्यक्ष बृजभूषण सिंग यांनी शरद पवारांची हकालपट्टी केली. त्यामुळं सिकंदर फक्त नावाला वापरला आहे, खरी मळमळ ही आहे.असं गाडे यांनी म्हटले आहे.