राज्यपाल सक्रिय आहेत म्हणूनच राज्य सुरळीत सुरु – रावसाहेब दानवे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर बसलेले नाहीत. तरीही राज्य व्यवस्थित सुरू आहे. कारण राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे, असा टोला रावसाहेब दानवे यांनी यांनी लगावला आहे.

रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर नाहीत तरी राज्य व्यवस्थित सुरू आहे. खरं तर आताच राज्य व्यवस्थित सुरू आहे. त्याचं कारण आहे की राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे.

आता मुख्यमंत्री या राज्याचा खुर्चीवर नसताना राज्य चांगलं चाललं तर याचं श्रेय या राज्यातील शांतता, संयमी आणि सहनशील जनतेचं आहे. सरकारचं नाही, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.