‘एका बेवड्या माणसांच्या बोलण्यावर ईडीची कारवाई ! ईडीच्या कार्यालयासमोर सगळं उघड करणार’

मुंबई : संजय राऊत यांनी ईडी आणि भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ईडीच्या कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेऊन हजारो लोकांच्यासमोर मोठा खुलासा करणार. तसेच त्याठिकाणी केंद्र सरकारसह तपास यंत्रणांचा चेहरा उघड पाडणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी अशा टोळ्यांविरोधात कारवाई करावी असंही त्यांनी आज सांगितले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवलेले पत्र हे फक्त माहितीसाठी लिहलं आहे. हा ट्रेलरसुद्धा नाही, अजून ट्रेलर यायचा बाकी आहे. इडीचे लोक कशाप्रकारे घोटाळा करताहेत, यांच्या कडूनच कशा प्रकारे मनी लॉड्रिंग होताहेत. हे सगळं सांगणार. हे लोकांना धमक्या देताहेत. मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतोय आणि त्यांना समजलंय की मला काय म्हणायचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या देखील कुटुंबातील लोकांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. रोज एक माणूस बेवड्यासारखा बडबडतोय आणि त्याच्यावर ईडी कारवाई करते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागरपुराला देखील जाता येणार नाही. माझी यापुढील कुठलीही पत्रकार परिषद शिवसेना भवनात घेणार आहे. त्यानंतरची पत्रकार परिषद हजारो लोकांच्या साक्षीने ईडीच्या कार्यालयाबाहेर घेणार आहे. त्याठिकाणी अनेक गोष्टी उघड करणार आहे.

भाजपचे नेते वारंवार सांगता आहेत की अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल. दगा करून आम्हाला ढकललंत तर आम्ही जावू. परंतु त्यानंतर तुम्हाला देखील यावं लागेल. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यात ईडीचा धाक दाखवला जात आहे. त्यांच्या नेत्यांना मोठ्या गुन्हांमध्ये अडकावून बदनाम करायचं. परंतु आमच्या सारखे नेते या दडपशाहीला झुगारणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.