Sanjay Raut | राज्य गुंडांच्या तावडीत; पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत

Sanjay Raut  : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर काल मुंबईतील दहिसर इथं गोळ्या झाडण्यात आल्या; त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मॉरिस नोरोन्हो याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. अभिषेक आणि मॉरिस फेसबुकवर लाईव्ह असताना ही घटना घडली. त्यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे अभिषेक घोसाळकर हे सुपूत्र होत. विनोद घोसाळकर हे २००९ ते २०१४ पर्यंत आमदार होते. दरम्यान, या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत.

दरम्यान, अभिषेक घोसाळकरवर झालेल्या गोळीबारानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील वाढलेल्या गुंडगिरीवरून कडाडून हल्लाबोल सुरुच ठेवलेल्या खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर यांनी ट्विट करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राऊत यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात.पक्षात प्रवेश देतात.गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे.अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय. आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत! फडणवीस राजीनामा द्या! असं राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ