‘महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून १०० टक्के शिवसैनिकांचेच नुकसान होत आहे’ 

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून १०० टक्के शिवसैनिकांचेच नुकसान होत आहे असं वक्तव्य शिवसेनेच्या खासदारानं केलंय. शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी जाहीरपणे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारबाबतची नाराजी व्यक्त केली.

आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, या काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या विधानावर हेमंत पाटील यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता? असा सवाल खासदार हेमंत पाटील यांनी चव्हाण यांना केला आहे.

आपला वापर होत असल्याच्या बाबी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत. केवळ उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत म्हणून सगळ सहन करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, यापूर्वी आ.प्रताप सरनाईक,रामदास कदम यांनी देखील काहीसे असे वक्तव्य करून शिवसैनिकांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.