संघ एकदाही भारताच्या स्वातंत्र लढ्यात नव्हता; उद्धव ठाकरेंचा संघावर आरोप

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच विरोधकांचा देखील ठाकरी शैलीत समाचार घेतला. (Uddhav-Thackeray-rally-in Mumbai).

यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (Rashtriya Swayamsevak Sangh) आरोप केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘संघ एकदाही भारताच्या स्वातंत्र लढ्यात नव्हता, कुठे होता संघ लढ्यावेळी?  स्वातंत्र्य लढण्यात संघाचे योगदान नाहीत. संयुक्त लढ्याच्या लढाईतून पहिलं कोण फुटलं तर यांचे बाप म्हणजे संघ… तेव्हा पासून मुंबईचा लचका तोडण्याचं काम सुरु आहे.’ असं ते म्हणाले.