आता आम्ही त्या गाढवांना सोडले आहे : उद्धव ठाकरे

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच विरोधकांचा देखील ठाकरी शैलीत समाचार घेतला. (Uddhav-Thackeray-rally-in Mumbai).

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला (BJP) चांगलच फैलावर घेतले आहे. ते म्हणाले, ‘बऱ्याच दिवसानी मैदानात उतरलो आहे. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी बोलाव लागत आहे. भाजपसोबत होतो तेव्हा आमचं हिंदुत्व गधाधारी होते.आता आम्ही त्या गाढवांना सोडले आहे.’ असं ते म्हणाले.