उद्धव ठाकरेंनीच शिंदे गटाकडे आमदारांना पाठवलंय? एकनाथ शिंदे म्हणाले…

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती केल्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना केडरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला. या सर्व कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. दरम्यान, आमदारांसोबतच आता खासदारही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ येताना दिसत आहेत.

यासंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आहेत. त्यातील एक म्हणजे, हा उद्धव ठाकरेंचाच प्लान असून त्यांनीच आमदारांना बंड करण्यास सांगितलं आहे. तसेच, शिंदे गटाकडे एकापाठोपाठ एक आमदारांचं जाणं हाही त्याचाच भाग आहे. एबीपी माझाशी एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन बातचित केली असता, त्यांना यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं.

सध्याची सुरु असलेल्या राजकीय पेचावर मोठी चर्चा आहे की, ही एकच शिवसेना आहे. हा उद्धव ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक आहे. त्यांनीच एक मोठा गट तुमच्याकडे पाठवला आहे? याबाबत बोलतााना शिवसेना (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, मला याबाबत काही माहीत नाही.