कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही – मंगल प्रभात लोढा

मुंबई – महाराष्ट्रातील नांदेड, अमरावती, मालेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटना दुर्देवी असून आम्ही त्यांच्या निषेध करतो. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर हिंसक घटना वाढत असून मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही असा इशारा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी दिला.

मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव आणि अमरावती येथील हिंसक घटनांच्या निषेधार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सीएसटी रेल्वे स्टेशन येथील अमर जवान ज्योत या स्थळी धरणे आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढत लोढा म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानतंर दंगलखोरांचा एक खास वर्ग सक्रिय होत हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. यासर्व हिंसक घटनामुळे राज्यातील हिंदू कुटुंबे आणि संस्थांचे नुकसान होत आहे. तसेच अफवांचा आधार घेऊन उघडपणे गुंडगिरी करत पोलिसांवर देखील लाठ्या-काठ्या, दगडफेक केली जात आहे. असला हिंसाचार मुंबईत होऊ देणार नाही असा इशारा मंगल जी यांनी दिला.

यावेळी मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते व आमदार प्रविण दरेकर, आमदार राहुल नार्वेकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार- पाटील

Next Post

आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले – उद्धव ठाकरे

Related Posts
कुंभमेळ्यादरम्यान शेअर बाजार का कोसळतो? गेल्या २० वर्षांपासून घडतंय असं

कुंभमेळ्यादरम्यान शेअर बाजार का कोसळतो? गेल्या २० वर्षांपासून घडतंय असं

महाकुंभ २०२५  ( Mahakumbh 2025) आजपासून सुरू झाला आहे. प्रयागराजमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत.…
Read More
Sunil Tatkare | विरोधकांकडून अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न, सुनील तटकरेंनी कार्यकर्त्यांना केले आवाहन

Sunil Tatkare | विरोधकांकडून अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न, सुनील तटकरेंनी कार्यकर्त्यांना केले आवाहन

Sunil Tatkare | राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या…
Read More
जातीनिहाय जनगणनेमुळे मागास, दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होईल

जातीनिहाय जनगणनेमुळे मागास, दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होईल

नवी दिल्ली | ( Murlidhar Mohol) मोदी सरकारने आगामी जनगणनेत जातीवर आधारित माहिती संकलित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला…
Read More