आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले – उद्धव ठाकरे

मुंबई – कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो.

असो, आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही – मंगल प्रभात लोढा

Next Post

मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही – थोरात

Related Posts
Pune Porsche Accident | अश्विनी कोस्टा वडिलांना देणार होती वाढदिवसाचं सरप्राईज, आईने सांगितली हकीकत 

Pune Porsche Accident | अश्विनी कोस्टा वडिलांना देणार होती वाढदिवसाचं सरप्राईज, आईने सांगितली हकीकत 

पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण (Pune Porsche Accident) सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर…
Read More
Raj Thackeray | आपल्या देशात भाऊ साठेंसारख्या कलाकारांची योग्य दखल घेतली जात नाही

Raj Thackeray | आपल्या देशात भाऊ साठेंसारख्या कलाकारांची योग्य दखल घेतली जात नाही

Raj Thackeray | ‘ख्यातनाम शिल्पकार कै. सदाशिव साठे ऊर्फ भाऊ’ यांनी साकारलेली शिल्प पाहत आम्ही मोठे झालो. भारतामध्ये…
Read More

एका कुटुंबातून एकाच सदस्याला उमेदवारीच्या ठरावाचं काय झालं? चिदंबरम यांच्या उमेदवारीवर देशमुखांचा आक्षेप

नागपूर – राज्यसभा निवडणुकीमुळे (Rajya Sabha Election) सध्या राज्यातील वातावरण तापले असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप…
Read More