महाराष्ट्रातील ‘या’ बड्या मंत्र्याची तक्रार करण्यासाठी विक्रांत पाटील यांनी लिहिले थेट राहुल गांधींना पत्र
पक्षांतर्गत निवडणुकांना जर इतके भयंकर प्रकार होत असतील तर प्रत्यक्ष इतर महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये राऊत काय पातळी गाठू शकतील याची कल्पना केली जाऊ शकते.पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनीही सरकारी यंत्रणाचा गैरवापर स्वतःच्या फायद्यासाठी केला होता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना पदापासून दूर व्हावे लागले होते. नितीन राऊत यांनी केलेला पदाचा गैरवापर आणि आपल्याला अपेक्षित निवडणूक पद्धतीचे काढलेले धिंडवडे यासाठी पक्षाचे वरिष्ठ या नात्याने आपल्याकडून त्यांचा त्वरित राजीनामा घेतला जावा ही मागणी पत्राद्वारे केली आहे.