शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तुंबळ युद्ध काही दिवसांत दिसेल – विनायक राऊत

मुंबई – शिंदे गट आणि भाजपा (BJP) यांच्यात तुंबळ युद्ध (A fierce battle) काही दिवसांत दिसेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंच शिल्लक राहिलेत. मंत्रिपद न मिळाल्यास अनेक आमदार मानगुटीवर बसणार आहे असं भाकीत खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी केले आहे.

तोंडाला पाने पुसली गेल्यानंतर १०० टक्के शिंदे गटात बंडखोरी होणार आहे. अतृप्त आत्मे एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या उरावर बसणार आहेत असा दावा त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्यांना स्वत:चा आवाज नाही. त्यांचे बोलवते धनी दिल्लीत आहेत.असं देखील ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झालेत. त्यांची नाराजी मध्ये मध्ये दिसते. केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केला अशा शब्दात विनायक राऊत यांनी भाजपा आणि फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. दरम्यान, या टीकेला आता शिंदे गट आणि भाजपा कसा उत्तर देणार हे पाहणे महात्चे असणार आहे.