आपली खेळी संपली हे तुमच्या लक्षात आलं आणि मग …; Prasad Lad जरांगेंवर बरसले

Manoj Jarange Vs Devendra Fadanvis | ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आक्रमक झाले आहेत. ओबीसीतून आरक्षण द्यावे तसेच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत असतानाच सरकारमधील मोठ्या नेत्यांवर विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, हि टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्या जातीचा उल्लेख केल्याने तसेच राजकीय स्वरूपाचे आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जरांगे यांनी फडणवीस यांना शिवीगाळ देखील केल्याने उलटसुलट चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. दरम्यान, फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर आता भाजपनेते आक्रमक झाले आहेत.

भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुला दहा टक्क्याचं आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळी संपली हे तुमच्या लक्षात आलं. समाजाच्या नावावर, लेकरू लेकरू करण्याचं बंद करा. समाजाची फसवणूक करू नका. तुमच्या सल्ल्याची समाजाला गरज नाही. फडणवीस यांच्यावर बोलू नये असे ते म्हणाले.

तुमचे बोलविते धनी कोण हे सर्वांना समजलं आहे. शरद पवार आहे की जालन्यातील भैय्या फॅमिली आहे? बोलवता धनी कोण आहे हे मनोज जरांगे यांनी सांगावं. त्यांनी नौटंकी बंद करावी, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. तुम्हाला फडणवीस यांचं नाव घेऊ नका म्हणून सांगितलं होतं. त्यानंतरही फडणवीस यांचं नाव घ्यायला तुम्हाला कोण लावतंय हे सर्वांच्या लक्षात आलं आहे, असंही लाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Nana Patole – १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार