राहुल शेवाळे यांचं लग्न ठाकरे घराण्याने वाचवलं; आदित्य ठाकरेंचा पलटवार

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी नुकतेच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतले आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

रिया चक्रवर्तीला AU या नावानं 44 फोन आल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपास AUचा उल्लेख अनन्या उधास आहे. तर बिहार पोलिसांच्या तपासात AU चा उल्लेख आदित्य उद्धव असा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळं त्याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे.

दरम्यान, शेवाळे यांनी मर्मावर बोट ठेवल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. मी त्यांना एवढंच सांगेन- लव्ह यू मोर. त्या घाणीत मला जायचं नाहीये. आम्हाला माहितेय ज्यांची निष्ठा स्वत:च्या घरात नसते, गद्दारी त्यांनी अनेकदा केलेली आहे. त्यांच्याकडून काहीही चांगलं अपेक्षित नाही  असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मी राहुल शेवाळे या व्यक्तीला काडीमात्र किंमत देत नाही. शेवाळे यांचं लग्न ठाकरे घराण्याने वाचवलं. मला यात जायचं नाही असंही आदित्य म्हणाले. काही लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात मला हस्तक्षेप करायचा नाहीये. कारण ते माझे संस्कार नाहीत. त्यामुळे मी त्या घाणीत जाणार नाही , असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यातले खरे प्रश्न बाजूला ठेऊन अशी घाणेरडी बदनामी करायची हा त्यांचा प्रयत्न असतो. मला यात जायचं नाही. ज्या मुख्यमंत्र्यांनी आज राजीनामा द्यायला हवा, त्यांना वाचवण्यासाठी, राज्यपालांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत .असं सांगत त्यांनी स्वतःचा बचाव केला