Aditya Thackeray | घोसाळकर प्रकरणावरून आदित्य ठाकरे संतापले; म्हणाले, मिंधेला बदनाम…

Aditya Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर काल मुंबईतील दहिसर इथं गोळ्या झाडण्यात आल्या; त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मॉरिस नोरोन्हो याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. अभिषेक आणि मॉरिस फेसबुकवर लाईव्ह असताना ही घटना घडली. त्यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे अभिषेक घोसाळकर हे सुपूत्र होत. विनोद घोसाळकर हे २००९ ते २०१४ पर्यंत आमदार होते. दरम्यान, या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत.

दरम्यान, अभिषेक घोसाळकरवर झालेल्या गोळीबारानंतर धक्कादायक असल्याचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटले आहे. अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आता बातमी आली त्याच्यावर गोळीबार झाला, काय चाललंय? गुंडांचं सरकार बसल आहे. आमदाराने गोळी घातली, ती पण पोलीस स्टेशनमध्ये. दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे, हे सरकार उलथून लावावं लागेल. मिंधेला बदनाम करायची गरज नाही ते बदनामचं आहे, महाराष्ट्र बदनाम होत असल्याचे ते म्हणाले. अमुक तमुक गुंडाची भेट हे घेत आहेत. गुंड मंत्रालयात रिल्स करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ