माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Mumbai – मागील काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू विरुद्ध आमदार रवी राणा असा संघर्ष सुरु आहे. रवी राणा यांनी कडू यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कडू यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले”, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राज्याबाहेर जाणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांसंदर्भात पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी हे विधान केलंय.

फडणवीस काय म्हणाले?
बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांना मी स्वत: फोन केला. त्यांना म्हटलं की आपल्याला सरकार बनवायचंय. आमची अशी इच्छा आहे की आपण युतीत असावं. त्यामुळे आपण गुवाहाटीला गेलं पाहिजे. या माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असं फडणवीसांनी सांगितलं.