‘संपूर्ण मुंबईतील शौचालयातून जेवढी घाण निघते, त्यापेक्षाही जास्त घाण रामदास कदम यांनी काल ओकली’

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर जाहीरपणे पातळी सोडून टीका करत आहेत. आधी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर टीका केली यानंतर या टीकेला कदम यांनी शेलक्या शब्दात उत्तर दिले आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी या टीकेचा समाचार घेतला आहे.

बंडखोर नेते रामदास कदम यांची रविवारी दापोलीत (Dapoli) सभा झाली. या सभेत त्यांनी शिवसेनेतील नेते आणि उद्धव ठाकरेंवरची नाराजी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांचीही चांगलीच धुलाई केली. त्याला प्रत्युत्तरादाखल भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले,  संपूर्ण मुंबईत जेवढी शौचालयं आहेत, त्यातून जेवढी घाण निघते, त्यापेक्षाही जास्त घाण रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी कालच्या सभेत ओकली, अशी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली. रामदास कदमांनी माझ्या मतदार संघात सभा घेतल्याचं काही नाही, मात्र उद्धव ठाकरेंबद्दल त्यांनी केलेलं आक्षेपार्ह विधान ऐकून राज्यातील जनता त्यांची जोड्याने पूजा करतील, असं वक्तव्य जाधव यांनी केलंय.