BMC ची ही शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा; देवेंद्र फडणवीस यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश 

मुंबई – मुंबई महानगर पालिकेची निवडणूक (BMC Elections) भाजपने चांगलीच मनावर घेतली असून पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यातच आज गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) आज मुंबई दौऱ्यावर असुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पदाधिकाऱ्यांची बैठकी देखील घेण्यात आली. यावेळी अमित शाह यांनी केलेल्या भाषणाची तर चर्चा होत आहेच पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या भाषणाची देखील चर्चा होत आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून आणि लढा आवेशपूर्ण  शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. आपले ‘मिशन मुंबई’ (Mission Mumbai) साठी सर्व पदाधिकरी नगरसेवक भाजपा कार्यकर्त्याचे महत्वाची भूमिका आहे. आता सर्वांनी तयारी जोरदार करायची असेही फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मुंबईत ओरिजनल शिवसेना (Shiv Sena) आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असे माना आणि अभी नही तो कभी नही असे ठरवा. आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन फडणवीसांनी केले.