देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे; ठाकरेंची टीका

मुंबई – गेल्या कधी दिवसांपासून राज्याचे ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष वाढला असून यात भाषेची मर्यादा देखील अनेकदा ओलांडताना नेते मंडळी दिसत आहेत. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे.

फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली. यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षावर स्वत:चा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

फडणवीस यांची खिल्ली उडवत ठाकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांची अवस्था अशी झाली आहे की, त्यांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. काय झाले असे विचारले तर ते काहीच बोलत नाहीत. काहीतरी घडले असेल पण ते सांगू शकत नाहीत. असं ते म्हणाले.