‘छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते, आहेत आणि राहणार… तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही’

Pune – गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान हा कळीचा मुद्दा बनला समाहे. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. आपण जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, असं अजित पवारांनी (Ajit Pawar On Dharmaveer)  म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी मंत्रिमंडळात असताना, निर्णय घेताना सगळ्यांना सांगायचो की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आपण करावा, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतःला जाणता राजा म्हणवून घेतात. खा. सुप्रिया सुळे  गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ज्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर आहे अशा पुस्तकाची जाहिरात करतातयामुळे पवार घराण्यावर आधीच शिवप्रेमी नाराज असताना आता अजित पवार हे संभाजी राजे धर्मवीर नव्हते, असं म्हणत आहेत. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्याचे आता पडसाद दिसू लागले आहेत. यावरून आता हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे  धीरज घाटे यांनी याच मुद्यावरून अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत .

धीरज घाटे याचं नेमकं म्हणणे काय आहे ?

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते, आहेत आणि राहणार… तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही…धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा निषेध करावा तितका कमीच आहे. मुळात हिंदूंबद्दल, त्यांच्या दैवतांबद्दल आणि त्यांच्या भावनांबद्दल कायम अनादरच व्यक्त करायचा, अशी काही लोकांना सवयच आहे. अजितदादांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. त्यांचा तसा उल्लेख करूच नका, असे म्हणून पुन्हा एकदा हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. आमच्यासाठी छत्रपती संभाजी महाराज कायमच धर्मवीर होते, आहेत आणि राहणार हे पुन्हा एकदा ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे आणि त्यांच्या धर्मवीरतेबद्दल तुमच्या सर्टिफिकेटची गरजही नाही. म्हणूनच अजितदादांच्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो.

विरोधी पक्षनेता या जबाबदार पदावर असताना आणि लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या विधानभवनामध्ये बोलताना अजितदादांनी इतिहासाची नीट उजळणी करून येऊन बोलणे अपेक्षित होते. तसे न करता छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्त्वाला कमी लेखण्याचे कामच त्यांनी आपल्या वक्तव्याने केले आहे. विधानसभेत केलेले हे वक्तव्य अजितदादांनी मागे घ्यावे आणि हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी मी हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने करतो.#अजितदादा पवार यांच्या वक्तव्याचा #जाहीर #निषेध… निषेध… निषेध…धीरज घाटे,अध्यक्ष,हिंदू गर्जना प्रतिष्ठान