भाईगिरीच्या वर्चस्वाचा वाद वाढला; चाकूने सपासप वार करून जयेशने अमोलचा काटा काढला

कल्याण – भाईगिरीच्या वर्चस्वाच्या वादातून  कल्याण पूर्वेत पूर्ववैमनस्यातून एका युवकाने दुसऱ्या युवकाची चाकूचे वार करून हत्त्या केल्याची घटना  घडली आहे . या घटनेतील आरोपीचा कोळसेवाडी पोलिसांनी तत्परनेने शोध घेऊन ताब्यात घेतले आहे . (Kalyan Crime)

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार ईश्वरी क्लासेस जवळ, नवीन दुर्गामाता मंदिर रोडवर, समता नगर काटेमानिवली या ठिकणी न्यू सुदर्शन कॉलनी काटेमानिवली कल्याण पूर्व येथे रहाणाऱ्या अमोल लोखंडे या ३९ वर्ष युवकाची कंचन कॉलनी, समता नगर, काटेमानिवली येथे रहाणाऱ्या ३२ वर्षीय टक्या उर्फ जयेश डोईफोडे या युवकाने पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून जखमी करून हत्त्या केली .

या घटनेची खबर लागताच कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी जयेश डोईफोडे याचा तत्परतेने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे .या खूनाच्या घटनेचा तपास कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक  महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे .

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मयत अमोल लोखंडे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात सहा ते सात गुन्हे दाखल असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली आहे. तर जयेश डोईफोडे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. भाईगिरीच्या वर्चस्वातून झालेल्या हत्येनंतर कल्याण पूर्व परिसरात दहशत पसरली आहे.