बहुजन हिताच्या 22 योजना नव्या सरकारकडून पुन्हा सुरू, मानावेत तेवढे आभार कमी- पडळकर

Mumbai –  राज्यात आलेल्या नव्या सरकारकडून  22 योजना  नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. तसे आदेश सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत.

“जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला’या धोरणांतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी लागू केलेल्या २२ योजना प्रस्थापितांनी बंद केल्या होत्या.त्याआता परत लागू करण्याचे साहेबांनी आदेश दिले आहेत.तुम्ही बहुजन समाजासाठी केलेलं काम कुणी झाकू शकत नाही. जय मल्हार!”, असं ट्विट पडळकर यांनी केलं आहे.