मुलगी पळून गेल्याने कुटुंबियांनी मुलाच्या आईला केली मारहाण, नग्न करुन खांबाला बांधले

Crime News: कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणानंतर तरुण गावातील तरुणीसोबत पळून गेला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या घरावर हल्ला केला. घराची तोडफोड केल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी  मुलाच्या आईला ओढत बाहेर नेले आणि नग्न करुन विजेच्या खांबाला बांधले. या प्रकरणाने जोर पकडल्यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचेही वक्तव्य समोर आले आहे. या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बेलावी जिल्ह्यातील न्यू वंतमुरी गावात घडली. कुटुंबीयांनी 18 वर्षीय तरुणी प्रियांकाची लग्न दुसऱ्या तरुणासोबत निश्चित केला होता. लग्नाच्या आधी ती त्याच गावातील अशोक या 24 वर्षीय तरुणासोबत पळून गेली. दोघांचेही एकमेकांवर खूप दिवस प्रेम होते. रात्री 12.30 च्या सुमारास दोघेही पळून गेले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या प्रियांकाच्या कुटुंबीयांनी मध्यरात्री अशोकच्या घरी जाऊन गोंधळ घातला.

7 जणांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंकाच्या संतप्त कुटुंबीयांनी अशोकच्या घरावर हल्ला केला. बरीच तोडफोड केल्यानंतर त्यांनी अशोकच्या आईला खेचून घराबाहेर काढले. त्यांना केवळ मारहाणच केली नाही तर विवस्त्र अवस्थेत खांबाला बांधले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि महिलेची सुटका करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेवर गृहमंत्री काय म्हणाले?
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गावात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गृहमंत्री जी परमेश्वर यांनी गावाला भेट दिली. मुलीच्या कुटुंबातील 10 ते 15 जणांनी महिलेच्या घरावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. ती घरी एकटीच होती. या महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरातून पळून गेलेला तरुण आणि तरुणीची माहिती गोळा करण्यात येत आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

हे ट्रिपल इंजिन सरकार नसून ट्रबल इंजिन सरकार; जयंत पाटील विधानसभेत गरजले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा;अशोक चव्हाण यांची मागणी

धीरज साहू यांच्याकडे इतका अमाप काळा पैसा असेल तर दुकानाच्या मालकाकडे किती काळा पैसा असेल ?