Mohan Joshi | भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’, मोहन जोशींचे टीकास्त्र

Mohan Joshi | पुणे लोकसभा (Pune Loksabha ) मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने प्रकाशित केलेले संकल्पपत्र हे भाजप परंपरेतील फसवणूक पत्रच आहे असे स्पष्ट दिसून येते. कारण गेली १० वर्षे केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर आहे. तसेच पुण्यात भाजपचे महानगरपालिकेत १०० नगरसेवक, ६ आमदार आणि १ खासदार असूनही पुण्याचा विकास ठप्प झाला, स्मार्ट सिटी योजना फसली, मेट्रो प्रकल्प किलोमीटरऐवजी इंच-इंचाने पुढे सरकत आहे, नदी सुधार प्रकल्पात प्रगती शून्य आहे, ट्रॅफिक समस्या अधिक जटिल झाली आहे. हे व असे अनेक प्रश्न सत्ता असूनही भाजपने सोडवले नाही आणि या नव्या संकल्पपत्रात मात्र ‘काय करणार’ याची जंत्री दिली आहे. पुणेकरांचा त्यामुळेच भाजपाच्या या संकल्पपत्रावर विश्वास बसणार नाही हे निश्चित, असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाने पुण्याचा सर्वांगीण चौफेर विकास केला, नव्या चांगल्या रोजगारांच्या संधी निर्माण केल्या. असे काहीही भाजपने संधी असूनही केले नाही. कारण पुण्याचा विकास करण्याची क्षमता, जिद्द, दूरदृष्टी आणि धमक त्यांच्यात नाही. त्यामुळेच भाजपचे आताचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’ आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी यावेळी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन