पंतप्रधानांनी लाल किल्‍यावरुन दिलेला संदेश आत्‍मसात करु या; विनोद तावडे यांचे आवाहन

मुंबई –अमृतमहोत्‍सवी स्‍वातंत्र्य दिना निमित्‍ताने लाल किल्‍यावरुन पंतप्रधानांनी दिलेला संदेश सगळयांनी नक्‍की ऐका, हाच आजच्‍या दिनाचा सर्वांसाठीचा संदेश असून पंतप्रधानांनी सांगितलेले पाच संकल्‍प आत्‍मसात करु या , असे आवाहन भाजपाचे राष्‍ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज येथे केले.

भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम वांद्रे सागरी सेतू जवळ समुद्र किना-या जवळ 100 फुटी राष्‍ट्रध्‍वज उभारला असून आज या तिरंग्याचे ध्‍वजारोहण भाजपाचे राष्‍ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

यावोळी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार, नगरसेविका अलका केरकर, स्‍वप्‍ना म्‍हात्रे, हेतल गाला, पोलीस उपायुक्‍त मंजुनाथ शिंगे, सहाय्यक पोलीस उपायुक्‍त गुणाजी सावंत, वरिष्‍ठ पोलीस निरिक्षक राजेश देवरे यांच्‍यासह अॅड प्रतिमा शेलार व ओमकार आणि अन्‍वी विनोद तावडे हे युवा पिढीचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात हिरहिरीने सहभगी झाले होते. दरम्‍यान त्‍यांनतर आमदार अॅंड आशिष शेलार यांच्‍या हस्‍ते भाजपाच्‍या मुंबई कार्यालयात ध्‍वजरोहण करण्‍यात आले.