फडणवीसांवरील टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणेंनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, म्हणाले…

मुंबई – गेल्या कधी दिवसांपासून राज्याचे ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष वाढला असून यात भाषेची मर्यादा देखील अनेकदा ओलांडताना नेते मंडळी दिसत आहेत. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे.

फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. यासोबतच ठाकरेंनी आपल्या भाषणात जहरी टीका भाजपवर केली.

दरम्यान, हि टीका केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंना उत्तर दिले आहे. मर्दानगी वर कलंक ! हिजड्यांच्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा..बायला कुठला!! असं असं म्हणत ट्वीट करत नितेश राणे यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडत टीका केली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.