‘भारतात पाकिस्तानसोबत तेच होईल जे…’ विश्वचषकातील पाक संघाच्या सुरक्षेबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे वक्तव्य

Pakistan Cricket Team Safety Concern: पाकिस्तानी क्रिकेट संघाने भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकापूर्वी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आता या प्रकरणी भारत सरकारचे उत्तर आले आहे. भारत सरकारने म्हटले आहे की विश्वचषक 2023 मध्ये (ICC World Cup 2023) पाकिस्तानी संघाला या स्पर्धेतील इतर संघांप्रमाणेच वागणूक दिली जाईल.

पाकिस्तान सरकारने आपला संघ भारतात पाठवण्यास मंजुरी देताना चांगली सुरक्षा देण्याची मागणी केली होती. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) विश्वचषक 2023 सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. याआधी दोन्ही संघांमधील हा सामना 15 ऑक्टोबरला घेण्याचे ठरले होते. पण, त्यात बदल करण्यात आला आहे.

भारतामध्ये विश्वचषक खेळण्याबाबत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलाबल भुट्टो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. यावेळी शेजारील देशाने त्यांच्या टीमला चांगली सुरक्षा देण्याची मागणी केली होती. राजकारण आणि खेळ यांची सरमिसळ करू नये, असे पाकिस्तानने म्हटले होते. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदनही जारी करण्यात आले आहे, ज्यात म्हटले आहे की, “पाकिस्तानचा असा विश्वास आहे की भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा आंतरराष्ट्रीय खेळांच्या मार्गावर येऊ नये. आम्ही पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात पूर्ण पाठिंबा देण्याची अपेक्षा करतो. पाकिस्तानी संघाला भारतात चांगली सुरक्षा दिली जाईल.”

आता यावर उत्तर देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी विश्वचषक 2023मध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. बागची म्हणाले, “पाकिस्तानी क्रिकेट संघाला आयसीसी विश्वचषकात सहभागी होणाऱ्या इतर देशांप्रमाणेच वागणूक दिली जाईल. बाकी राहिला सुरक्षेचा प्रश्न, तर हे प्रश्न आमच्या सुरक्षा संस्था आणि आयोजकांना विचारले पाहिजेत.”

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत आणि या स्पर्धेची सांगता 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्याने होईल. भारत प्रथमच वनडे विश्वचषक स्वत: आयोजित करत आहे. 2011 नंतर म्हणजे 12 वर्षांनंतर, 50 षटकांचा वनडे विश्वचषक आयोजित केला गेला, त्यानंतर भारत संयुक्तपणे यजमान होता. यापूर्वी 1996 आणि 1987 मध्ये भारताने संयुक्तपणे वनडे विश्वचषक स्पर्धा आयोजित केली होती. पाकिस्तानचा क्रिकेट संघ सात वर्षांनी भारतात येणार आहे. शेजारी देश शेवटच्या वेळी 2016 मध्ये टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी येथे आला होता.