काश्मीरचा मुद्दा पंडित नेहरुंनी जागतिक पातळीवर नेण्याची गरज नव्हती – सीतारामन

नवी दिल्ली- भाजपकडून सातत्याने देशाचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांवर टीका केली जात असते. यातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्यावरुन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या धोरणावर टीका करत काँग्रेला लक्ष्य केलं.

अर्थमंत्री म्हणाल्या, काश्मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत विषय होता. पंडित नेहरुंनी त्याला जागतिक पातळीवर नेण्याची गरज नव्हती असे वक्तव्य करून नच्या वादाला सुरुवात केली आहे. सीतारामन या राज्यसभेत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

निर्मला सीतारामन यावेळी बोलताना काश्मीर हा भारत देशासाठी हा महत्त्वाचा विषय आहे. पाकव्याप्त कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा ठराव १९९१ मध्ये मंजूर करण्यात आला. हा भारताशी संबंधित मुद्दा होता. मात्र अभ्यास केल्यानंतर समजतं की या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचे काम काँग्रसने केले, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

काँग्रेसने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रामध्ये नेला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू या मुद्द्याला संयुक्त राष्ट्रामध्ये घेऊन गेले, असे अभ्यास केल्यानंतर समोर येते. त्यांनी असं का केलं ? कारण अभ्यास केल्यानंतर समजलं की १९४७ च्या डिसेंबरमध्ये ब्रिटिशांनी नेहरुंना हा मुद्दा संयुक्त राष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचा सल्ला कदाचित दिला असावा. काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय बनवण्यात आला. पाकिस्तान त्याचा दुरुपयोग करत आहे. हा मुद्दा जागतिक स्तरावर जायला नको होता” असंदेखील निर्मला सीतारामन म्हणाल्या.