चित्रा ताई भाजपमध्ये जाऊन पवित्र झालेल्या आपल्या लाडक्या भावाला नक्की ओवाळतील – राष्ट्रवादी

मुंबई : आज मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज पार पडला यात टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतरही सत्तारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) आमदार संजय राठोड यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले होते त्यांची देखील या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागली आहे.

विशेष म्हणजे पूजा चव्हाण या तरूणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर आरोप करत देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ आणि भाजपनं (Devendra Fadnavis, Chitra Wagh and BJP) त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, कधीकाळी चारित्र्यहीन म्हणून भाजपने ज्यांचा राजीनामा घेतला ते संजय राठोड आज फडणविसांच्या (पर्यायाने शिंदे गटाच्या ) मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेत आहेत. योगायोगाने भाऊबीज जवळच आहे, चित्रा ताई भाजपमध्ये जाऊन पवित्र झालेल्या आपल्या लाडक्या भावाला नक्की ओवाळतील.असं जगताप यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आता पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.