सुप्रियाताईंचा निर्भय आरोप, चित्राताईचा धाडसी खुलासा, तोंडघशी कोण पडलं?
राम कुलकर्णी – शिंदे-फडणवीस सरकारने निर्भया निधीचा वापर पोलीस खात्यात वाहने खरेदी करण्यासाठी केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळेंनी निर्भयपणे केला असला तरी राजकारणात वेग बोलणं किती अंगलट येतं? याचं उदाहरण समोर आलं. त्यांच्या खुलाशाला धाडसीपणातुन उत्तर देताना भाजपाच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्भया निधीचा वापर पुर्णत: झाला हे सांगताना पोलीस खात्यात किती वाहने आली? आणि कोणत्या मंत्र्याकडे किती वाहने गेली? याचा हिशोबच सादर केला. सत्ताधाऱ्यांना काम करू द्यायचं नाही. केवळ त्यांची बदनामी करायची. हीच मानसिकता घेवुन विरोधक जर समाजात काम करू लागले तर सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्र्वास उडाल्याशिवाय रहात नाही हे तितकंच खरं. बोलायचं म्हणुन बोलायचं हे सुप्रियाताईच्या नेतृत्व्ााला शोभते का? असे अनेक सवाल निर्भया निधीच्या गदारोळानंतर पुढे आले.
2019 मध्ये सत्ता स्थापनेसाठी जनाधार भाजप-शिवसेना युतीला मिळाला होता.केवळ मुख्यमंत्री पदासाठी जनादेशाला ठोकर मारत शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ज्यात मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्यात आलं अर्थात उद्धव ठाकरे.वास्तविक पाहाता तत्कालीन काळात ठाकरेंनी जनादेश डावलला नसता तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सत्तेच्या सारीपाटावर आलीच नसती. या साऱ्या घडामोडीत संजय राऊतांनी कमालीचा घेतलेला सहभाग कारणीभुत ठरला. शिवसेना बारामतीकरांच्या दावणीला बांधण्यात राऊत यांसारखे कारणीभूत ठरले. ज्याचे परिणाम कालांतराने शिवसेना दुभांगणीत झाले.