“संभाजी भिडेंना महाराष्ट्रातून नाही तर देशातून तडिपार केलं पाहिजे”, काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल

अमरावती : महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत, असे वक्‍तव्‍य शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले आहे.

बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी भिडे यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान आता काँग्रेस आमदार विजय वेडट्टीवर यांनी संभाजी भिडेंवर हल्लाबोल केला.

“संभाजी भिडेंना महाराष्ट्रातून नाही, तर देशातून ह्द्दपार केलं पाहिजे. भिडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना महाराष्ट्रातून नाही, तर या देशातून तडीपार केलं पाहिजे. तुमची यंत्रणा सक्रीय केली पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ कसे नाही सापडतं. तुमचे लागेबंधे आहेत का? म्हणून तुम्ही बेजबाबदारपणे वागता का? राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तुम्ही भांग पिऊन येता का? हे सहन केलं जाणार नाही” असा इशारा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला.

तर “त्यांचं नाव संभाजी नाहीय, हे टोपण नाव आहे. मनोहर भिडे नाव आहे. मराठा आणि बहुजन समाजाच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली विष पेरण्याच काम हा संभाजी भिडे करतोय” असा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.

“महात्मा गांधीं विरोधात बोलण्याची संभाजी भिडेची औकात आहे काय? आंबे खाल्ल्याने मुलगा होतो म्हणणारा हा बिनअकलेचा पेंद्या, हा मनोहर भिडया. महात्मा गांधीबद्दल असं जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य करत असेल, सरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन कारवाई करावी” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

https://youtube.com/shorts/xqS0Kf2zYsM?feature=share